खडकजांब परिसरात शेतीसाठी सुपीक जमीन आहे. येथे मुख्यत्वे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. हवामान अनुकूल असल्याने आणि माती सुपीक असल्याने उत्तम दर्जाचा कांदा उगवतो. शेतकरी आधुनिक पद्धतींचा वापर करतात, जसे की ठिबक सिंचन, सेंद्रिय शेती आणि यंत्रसामग्रीचा वापर. कांद्याला बाजारात चांगली मागणी असल्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. सरकारच्या योजना आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाल्याने शेतकरी अधिक उतपादन घेत आहे. शेतकऱ्यांनी एकत्र काम करून आणि पाण्याचा योग्य वापर करून कांद्याच्या लागवडीत चांगली प्रगती साधली आहे.


